यावल ( प्रतिनिधी ) – यावल ते विरावली रस्त्या दरम्यान दोन मोटरसायकलींचा समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात पाच जण जख्मी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज सांयकाळी ५ ते ५ ,३oवाजेच्या सुमारास विरावली यावल रस्त्यावर दोन मोटरसायकलची समोरा-समोर धडक झाल्याने भिषण अपघात झाला असुन , या अपघातात पाच जण जख्मी असल्याची माहीती समोर येत असुन यात जखमींची नांवे सागर चंद्रकांत तायडे (२५वय) व भीमराव इंधाटे दोघ राहणार कोरपावली तर गणेश संजय चौधरी (२२वय) आणी मोहीत संतोष पाटील राहणार विरावली ,गौरव पुर्ण माहीत नाही असे पाच जण या अपघातात जख्मी झाले आहे.
सर्व जख्मींवर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिशान खान यांनी व त्यांच्या सहकार्यानी जखमींवर प्रथमपोचार केलेत व यातील दोन गंभीर जख्मींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तर दोन जणांना भुसावळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात मात्र अद्याप अपघाताची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाल्याचे वृत्त कळताच यावल भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, मुवा मोर्चाचे परेश नाईक, भुषण फेगडे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जख्मींच्या तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केले.