Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नळाला दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद महिलांनी काढला हंडा मोर्चा ग्रामपंचायतीवर

by Divya Jalgaon Team
June 2, 2022
in जळगाव, सामाजिक
0
नळाला दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद महिलांनी काढला हंडा मोर्चा ग्रामपंचायतीवर

माळशेवगे – गावातील नळाला दीड महिन्यापासून पाणी येत नसल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत मुबलक पाण्याचा साठा असल्यावर सुध्धा पाणी येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य समोर डोक्यावर हंडा कळशी घेऊन मोर्चा काढत पाण्याची मागणी केली.

तालुक्यातील शेवरी तांड्याला नेहमी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासतो. विहिरीवर असलेल्या मोटारीचे बिल ग्रामपंचायत भरत नसल्यामुळे महावितरण महामंडळाने वीज पुरवठा खंडित केला आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी तयार नाही असे समजते. त्यामुळे गावातील नळाला पाणी पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हंडाभर पाण्यासाठी रानात वणवण फिरावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गेल्या दीड महिन्यापासून गावातील महिलांना आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन डोक्यावर किंवा सायकल, मोटार सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टरवर पाणी आणावे लागत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना अनेकदा तोंडी तक्रार करूनही पाणीप्रश्न सुरळीत झाला नसल्यामुळे अखेर महिलांनी हंडा मोर्चा काढला.

गावात बंजारा समाज, भिल्ल (आदिवासी) समाज, व दलीत वस्ती इत्यादी मागासवर्गीय समाज असल्यामुळे त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा सुर निघत आहे. ऊसतोड मजूर गावी आल्यावर नेहमी त्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो पाण्याचा ! दरवर्षी एन उन्हाळ्यात शेवरी गावाला पाण्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागते. अखेर सरपंचपती डिगंबर मोरे यांनी उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महिलांनी तात्पुरता मोर्चा मागे घेतला.

Share post
Tags: #Handa Morcha#Whater supply problems#महिलांचा काढला हंडा मोर्चा ग्रामपंचायतीवर
Previous Post

मुंगसे येथे कुत्र्याच्या हल्यात काळवीट जखमी

Next Post

विळ्याने वार करून वृध्द महिलेची निर्घृण हत्या

Next Post
विळ्याने वार करून वृध्द महिलेची निर्घृण हत्या

विळ्याने वार करून वृध्द महिलेची निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group