Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मोदी सरकार गरिबांसाठी घेणार मोठा निर्णय

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in राष्ट्रीय
0
narendra modi news

नवी दिल्ली –  देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही अजूनही अर्थव्यवस्था पूर्णपणे रुळावर आलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम उद्योगधंद्यांवर झाला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर कित्येकांना अद्यापही पगार कपात सहन करावी लागत आहे. त्यामुळे मागणी घटली आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे लवकरच मोदी सरकार तिसऱ्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.मोदी सरकार गरिबांसाठी घेणार मोठा निर्णय.

सध्या स्थितीला  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत गहू, तांदूळ आणि चणाडाळ मोफत दिली जाते. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ही योजना सुरू झाली. सुरुवातीला तिची मर्यादा जूनपर्यंत होती. त्यानंतर ती नोव्हेंबरपर्यंत वाढवली गेली. आता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षेसाठी राबवण्यात येणारी ही योजना मार्चपर्यंत सुरू राहू शकते.मोदी सरकार गरिबांसाठी घेणार मोठा निर्णय.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. सरकारने एकदा या योजनेला मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा योजनेचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  प्रोत्साहन पॅकेज ३.० मध्ये मागणी वाढवण्यावर आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपायांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजच्या माध्यमातून सरकार २० कोटी जन-धन खात्यांमध्ये आणि ३ कोटी गरीब, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांच्या खात्यांत रोख रक्कम थेट जमा करू शकतं. ही रोख मदतही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा भाग असेल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत यांचा समावेश- 

– प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्याला ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळतात. या योजनेचा फायदा जवळपास ८१ कोटी लोकांना मिळत असल्याचा सरकारचा दावा आहे.

– याशिवाय १९.४ कोटी कुटुंबांना दर महिन्याला १ किलो चणे मोफत दिले जातात.

– राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत या अन्न धान्याचं वाटप करण्यात येत आहे.

अजून वाचा 

मुलींच्या लग्नवयाचा निर्णय लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share post
Tags: loksatta newsMarathi NewsModi SarkarNew DelhiPM Narendra Modiमोठा निर्णय
Previous Post

अमळनेरात हॉटेल चालकांवर डीवायएसपी यांची कारवाई

Next Post

राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे

Next Post
jalgaon news

राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group