मुंबई – राज्यात नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू होऊन महिना पूर्ण होण्याआधीच विद्यार्थ्यांचा हजेरीपट 10 लाखांच्या वर गेला आहे. 23 नोव्हेंबरला शाळेच्या पहिल्या दिवशी तीन लाख विद्यार्थी हजर होते. सोमवारी दहा लाखांचा टप्पा पार करीत तब्बल 10 लाख 72 हजार 490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली आहे. तर सुरू झालेल्या शाळांची संख्याही आता दुप्पट झाली असून राज्यभरातील 16 हजार 620 शाळा विद्यादानाचे काम करीत आहेत.
कोल्हापूर जिह्यात सर्वाधिक हजेरी
सोलापूर जिह्याला मागे टाकत कोल्हापूर जिह्यातील विद्यार्थीसंख्येचे प्रमाण वाढले आहे. 9 डिसेंबरला या जिह्यात 50 हजार 5541 विद्यार्थी हजर होते. पाच दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आहे. सोमवारी जिह्यातील हजेरीचा पट 1 लाख 44 हजार 247 नोंदविला गेला. तर जिह्यातील 960 शाळा सुरू झाल्या आहेत.
23 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात राज्यातील 70 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणही 19 टक्क्यांवर पोहोचले आहे. 9 डिसेंबरपासून मागील पाच दिवसांत शाळेतील हजेरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 9 डिसेंबरला 6 लाख 4 हजार 884 विद्यार्थीसंख्या नोंदवली गेली होती तर 11 हजार 410 शाळा सुरू झाल्या होत्या. राज्यातील मुंबई व ठाणे जिह्यातील एकही शाळा अद्याप सुरू झालेली नाही.
जिह्यानिहाय सुरू झालेल्या शाळांची संख्या
जिल्हा 2 डिसेंबर 14 डिसेंबर
रत्नागिरी 345 349
सांगली 654 680
रायगड 334 349
सिंधुदुर्ग 188 197
वाशीम 346 352
कोल्हापूर 546 960
पुणे 638 721
वर्धा 307 312
धुळे 0 242
नांदेड 830 854
नागपूर 1 646
परभणी 419 528
पालघर 66 151
हिंगोली 41 41