Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना: प्रभाग १३ च्या नागरिकांशी केली चर्चा

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

जळगाव – त्र्यंबक नगरातील बाहेती शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याला सुरक्षा कठडे नसून खाली जवळपास १५ फुटाची दरी आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. सुरक्षा भिंत अथवा कठडे तयार करण्यासाठीबाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!

उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १३ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, चेतन सनकत, मनोज आहुजा, भरत सपकाळे, मनोज काळे, चंदन महाजन, कुंदन काळे, महेश जोशी, राहुल वाघ आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

मेहरूण तलाव परिसरात गटारींची व्यवस्था करा

मेहरून तलाव काठ परिसरात अनेक रहिवासी असून त्याठिकाणी गटारी नाही. तसेच इतर प्रभागातील पाणी त्याठिकाणी जमा होत असल्याने डास, मच्छरांचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांना याबाबत विचारणा केली असता तलाव परिसरात बांधकाम परवानगी देताना त्याठिकाणी नागरिकांनी स्वतः शोषखड्डा तयार करून त्यात सांडपाणी जिरवावे अशी अट घालून देण्यात आलेली असल्याची माहिती दिली. दरम्यान, उपमहापौरांनी तलाव परिसरात भूमिगत गटारी करता येतील का याची माहिती घेऊन नागरिकांची सोय करून द्यावी, असे सांगितले.

आदर्शनगरातील भिंत हटविण्याबाबत पत्रव्यवहार करावा

आदर्श नगरात समाजकल्याण कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या गल्लीतून पूर्वी महाबळमध्ये जाण्यासाठी रस्ता होता परंतु आता त्याठिकाणी पक्की भिंत बांधण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी शेणखत, कचरा टाकण्यात येत असल्याने डास, मच्छरांचा त्रास होतो. परिसरातील नागरिकांनी याबाबत उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे तक्रार करीत निवेदन दिले. उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना सूचना देत भिंत हटविण्याबाबत माहिती घेऊन संबंधित विभागाकडे संपर्क करण्याच्या सूचना केल्या. तसेच शेणखत आणि इतर कचरा साफसफाईचे काम योग्य पध्दतीने करण्याचे सांगितले.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMahapaurMarathi Newsबाहेती शाळेजवळील रस्त्याला सुरक्षा कठडे उभारावे!
Previous Post

श्रद्धा कॉलनीत विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक

Next Post

अभाविपच्यावतीने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत

Next Post
अभाविपच्यावतीने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत

अभाविपच्यावतीने विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group