Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार 

शिवसेना ठाकरे गटांचा जिल्हा मेळाव्यात पदाधिकार्‍यांचे पराभवावर मंथन

by Divya Jalgaon Team
March 24, 2025
in जळगाव, राजकीय
0
पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार 

जळगाव – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाला ईव्हीएम यंत्रणाच जबाबदार असल्याचा सूर रविवारी उबाठा गटाच्या मेळाव्यात पदाधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान जिल्हा मेळाव्यात पदाधिकार्‍यांनी पराभवावर मंथन केले.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा मेळावा रविवारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगावचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत होते. तर व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नवनियुक्त जळगाव लोकसभा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, वैशाली सूर्यवंशी, महिला संघटक महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, रमेश माणिक पाटील, यांच्यासह तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात रमेश माणिक पाटील, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, पाचोराचे तालुकाप्रमुख यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. ज्याठिकाणी ईव्हीएम बंद पडत होते, त्याठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर होते असा दावा पदाधिकार्‍यांनी केला.

निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकर्‍यांना कर्जमाफी करू असेही सांगितले होते. मात्र सत्ता येताच महायुती सरकारने यु-टर्न घेतला असून अर्थसंकल्पात लाडकी बहिण आणि शेतकर्‍यांची कर्जमाफी ह्याचा साधा उल्लेखही केला नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तो मोठा पराभव ठाकरे गटाला पत्करावा लागला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी महायुती सरकारला उघडे पाडण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा सूर पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

Share post
Tags: #Jalgaon Jilha Melava#Jilhapramukh Thakre Gat#ईव्हीएमjalgaon political newsKulbhushan Patil
Previous Post

सीमा विठ्ठल पाटील यांना राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार सन्मानाने प्रदान

Next Post

उद्या होणार आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा

Next Post
उद्या होणार आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा

उद्या होणार आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group