Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खडसेंच्या पत्रामुळेच शेतकरी विम्यापासुन वंचित

भाजप नंदकिशोर महाजन व शिंदे गटा चे आ. चंद्रकांत पाटील कडून पत्रकार परिषदेत आरोप

by Divya Jalgaon Team
October 18, 2023
in कृषी विषयी, जळगाव
0
खडसेंच्या पत्रामुळेच शेतकरी विम्यापासुन वंचित

जळगाव – जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत. हा विषय सध्या खूप गाजत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यावर निराधार आरोप करून सरकारची बदनामी केली होती. मात्र प्रत्यक्षक्षात दि. 13 ऑगस्ट रोजी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पीक विम्याच्या लाभासाठी बनावट माहिती सादर केली म्हणून चौकशीची मागणी केल्याचे पत्र दिले. आ. खडसेंच्या या पत्रामुळेच शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहील्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

केळी पिकविम्यासंदर्भात आ. चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे नंदकिशोर महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, केळी पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा रोष पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनीच 13 ऑगस्ट 2023 रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवून, जिल्ह्यात अनेकांनी बनावट कागदपत्रे काढून पीक विमा काढल्याची तक्रार केली होती.

तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली होती. याच पत्रामुळे पडताळणी करण्याचे काम सुरु झाल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळत नसल्याचा आरोप केला होता. मात्र शेतकर्‍यांची चौकशी लावण्याचे पत्र खडसेंनीच दिल्याचे सांगत ते गझनी असल्याचा उल्लेख आ. पाटील यांनी केला. दरम्यान शेतकर्‍यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत केळी पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचा दावाही आ. पाटील यांनी केला.

Share post
Tags: #Chandrakant patil#farmar#krushi#nandkishor mahajanEknathrao Khadse
Previous Post

सामाजिक न्याय विभागाचे जितेंद्र अरुण भाई चांगरे यांची उपोषण स्थळी भेट

Next Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण शाळांमधील १०० मुलींचे कन्या पूजन

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण शाळांमधील १०० मुलींचे कन्या पूजन

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण शाळांमधील १०० मुलींचे कन्या पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group