जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गात जिल्ह्याच्या दृष्टीने रविवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक ठरला. कारण नव्या बाधितांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निचांकी आकड्याची नोंद आज झाली. जिल्ह्यात दिवसभरात केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले, तर ६८ बरे झाले. दरम्यान, जिल्ह्यात आठ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव ग्रामीण, चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड या तालुक्यात आजही एक रूग्ण आढळले नाहीत. तर जळगाव शहर-११, भुसावळ, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण असे एकुण जिल्ह्यात आज १८ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार ५५० रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ७०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५७१ रूग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली आहे.


