जळगाव प्रतिनिधी – जिल्हा परिषदेतील असमान निधी वाटपाबाबत शासनाकडून चाैकशीचे आदेश येऊनही आतापर्यंत चाैकशी सुरू झालेली नाही तसेच गटनेत्यांकडून ही याबाबत प्रतिसाद नसल्याने प्रशासनापुढे चाैकशीचा तिढा वाढला आहे. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका असताना असमान निधी वाटपाचा वाद समोर आला आहे.
जिल्हा परिषदेला विविध याेजनांमधून प्राप्त झालेल्या तब्बल २५ काेटी रुपयांच्या निधीतील कामे केवळ १० ते १२ सदस्यांनीच आपसात वाटून घेतली आहेत. इतर सदस्या या निधीपासून वंचित आहेत. गेल्या पाच वर्षांपासून निधी वाटपाची हीच पद्धती असल्याने राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा.डाॅ.नीलम पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून जिल्हा परिषदेला असमान निधी वाटपाबाबत चाैकशी करून अहवाल पाठवण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीची तयारी सुरू झाली आहे.