Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अर्णब गोस्वामी यांचे हातवारे पाहून न्यायाधीश भडकले

by Divya Jalgaon Team
November 5, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
अर्णब गोस्वामी यांचे हातवारे पाहून न्यायाधीश भडकले

रायगड –   इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना चॅनेलचे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  या प्रकरणात बुधवारी  सकाळी अर्णब यांना  अटक केल्यापासून  ते  कोर्टात त्यांना पोलीस कोठडीची सुनावणी होईपर्यंत अगदी नाट्यमय घडामोडी सुरू होत्या.  अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं.अर्णब गोस्वामी यांचे हातवारे पाहून न्यायाधीश भडकले.

त्यानंतर पुन्हा एकदा गोस्वामींच्या आरोपावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर गोस्वामी यांनी कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर ते कोर्टात गेले, तेव्हा ते काही हातवारे, तसेच  इशारे करत होते. त्यांचं हे वर्तन पाहून न्यायाधीश भडकले आणि त्यांनी अर्णब गोस्वामी यांना समज दिली की, ‘तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका.’ त्यानंतर अर्णब गोस्वामी यांचं न्यायालयातील वागणं बदललं आणि ते शांत बसून सुनावणी ऐकत होते. मारहाण केल्याचा गोस्वामी यांचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला. त्यानंतर त्यांच्या रिमांड अर्जावर सुनावणी सुरू झाली.

कोर्टासमोर हा अहवाल आहे आणि तो कोर्टानं मंजूर केला आहे. असं असूनही कोर्टाची परवानगी न मागता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे,अर्णब गोस्वामी आणि इतरांना केलेली अटक अवैध होती, असं निरीक्षण कोर्टानं त्यांच्यासमोर आलेल्या कादपत्रांअंती नोंदवलं आहे.

या प्रकरणावर  जवळपास ८ ते ९ तास  सुनावणी चालली. त्यानंतर कोर्टानं गोस्वामी आणि इतर आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रायगड पोलिसांचा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना रात्र जेलमध्येच काढावी लागली. कारण त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असला तरी त्यावर सुनावणी कधी होईल हे न्यायालयानं अजून निश्चित केलेलं नाही. कारण त्यांनी सरकारी वकिल आणि चौकशी अधिकाऱ्यांना या अर्जावर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर कधी सुनावणी होईल, हे स्पष्ट झालेलं नाही.

अजून वाचा 

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

Share post
Tags: Arnab GoswamiJudgeMumbai Latest NewsPoliceRaigad newsअर्णब गोस्वामी यांचे हातवारे पाहून न्यायाधीश भडकले
Previous Post

जळगावात गरीब गरजूंना ५० कंबल वाटप

Next Post

घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये आयुक्तांच्या मदतीने कोट्यवधींचा घोळ !

Next Post
भाजपा जिल्हाध्यक्षांकडून महाजन यांचा बचाव कशासाठी?

घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये आयुक्तांच्या मदतीने कोट्यवधींचा घोळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group