Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

व्यवसायात तंत्रज्ञानांचा अधिकाधिक वापर करून यशस्वी व्हा – धांडे

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात "टेक्नोलॉजी इन फॅमिली बिजनेस" या विषयावर ऑनलाईन वेबिनार

by Divya Jalgaon Team
September 9, 2021
in जळगाव
0

जळगाव, प्रतिनिधी । येथील रायसोनी महाविध्यालयात एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली मॅनेज्ड बिजनेस मुंबई व रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या संयुक्त विध्यमानाने “टेक्नोलॉजी इन फॅमिली बिजनेस” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिक येथील गोविंद धांडे प्रा. ली.चे संचालक श्री.योगेश्वर धांडे व भरूच येथील मरकेम लिमिटेडच्या संचालिका अदिती होलानी तसेच रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. अग्रवाल यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत स्पष्ट केले तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर कार्यशाळेचे प्रमुख पाहूणे व नाशिक येथील गोविंद धांडे प्रा. ली.चे संचालक श्री.योगेश्वर धांडे यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ऑटोमेशन, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे शब्द व्यवसाय क्षेत्रात सामान्य झाले आहेत.

आजचे तंत्रज्ञान वापरण्याचा एक मोठा फायदा म्हणजे तो कोणतेही काम करण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो. मशीन जास्त प्रयत्न न करता मर्यादित वेळेत जास्त काम करू शकते. संगणकीय शक्ती वाढवल्यानंतर, जटिल आणि अगदी मोठी कामे काही मिनिटांत हाताळली जातात. कमी किंवा मर्यादित वेळेत जास्त काम पूर्ण करता येत असल्याने, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने उत्पादकता लक्षणीय वाढते. एखादी व्यक्ती इतर महत्वाची कामे करण्यास मोकळी होते. यामुळे व्यक्तीच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर होतो. यामुळे एकूण उत्पादकता वाढते. यावेळी धांडे यांनी डिजिटल मार्केटिंग, डिजिटल व्हेलेट, फ्लिपकार्ट, नेटबँकिग सिस्टिम्स तसेच लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या विविध मुध्यांवर आपल्या मनोगतात भर दिला. यानंतर भरूच येथील मरकेम लिमिटेडच्या संचालिका अदिती होलानी यांनी आपल्या मनोगतात मत मांडले की, या बदलत्या आधुनिक युगात तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, मग ते क्षेत्र कोणतेही असो. तंत्रज्ञानाशिवाय कोणतेही काम करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. आजच्या युगात, लोक व्यवसायात एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत आहेत आणि हे केवळ नवीनतम तंत्रज्ञानाद्वारे शक्य होऊ शकते. तंत्रज्ञानाने व्यवसाय करण्याची संपूर्ण पद्धत बदलली आहे, आजच्या काळात, बहुतेक लोक व्यवसाय करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरत आहेत. कारण याच्या मदतीने तुम्ही घरी बसून तुमचा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकता आणि वाढवू शकता, तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकता. व्यवसाय वाढवण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, मग ते विपणन असो किंवा उत्पादन, तुम्हाला सर्वत्र तंत्रज्ञानाची भूमिका दिसेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर ऑनलाईन कार्यशाळेत २०० विध्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. तन्मय भाले यांनी सहकार्य केले

Share post
Previous Post

झांबरे विद्यालयात शिक्षकांनी केला पालकांचा सत्कार

Next Post

दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार, चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group