Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हर्षवर्धन कॉलनीत गटारीचे काम अपूर्ण, गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेनचे याकडे दुर्लेक्ष

घरात येण्या-जाण्यासाठीसुद्धा रहिवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागते

by Divya Jalgaon Team
March 19, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन, राजकीय
0
हर्षवर्धन कॉलनीत गटारीचे काम अपूर्ण, गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेनचे याकडे दुर्लेक्ष

जळगाव – शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये जळगाव महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या गटारींच्या कामामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. बांधकामासाठी गटारी मोकळ्या केल्याने रस्त्यांमध्ये पाणी सोडून दिल्याचे वास्तविक चित्र आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान महापौरांनी तत्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असतानाही कामे होत नसल्याने नागरिकांविषयी महापालिकेची उदासिनता समोर आली आहे.

जळगाव शहरात सुरू असलेल्या गटारींच्या कामांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जळगावकरांना विकासकामांचाच विटाळ आला आहे. ठेकेदार अर्धवट कामे सोडून देत असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. जळगाव शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये असाच प्रकार घडला आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी गटारी मोकळ्या केल्याने पाणी मोकळे सोडून दिले जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांची दखल घेतली जात नाही.

त्यामुळे हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घटनास्थळ गाठले. हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून घेत महापालिकेचे प्रकाश पाटील नामक अधिकाऱ्यांना व संबंधित कामाच्या ठेकेदारांना गटारींचे काम लागलीच करण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेने याकडे दुर्लेक्ष केले आहे. घरात येण्या-जाण्यासाठीसुद्धा हर्षवर्धन कॉलनीतील रहिवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान परिसरातील गटारींचे कामे लवकर करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi Newsमहानगरपालिकाहर्षवर्धन कॉलनीत गटारीचे काम अपूर्ण
Previous Post

पाचोरा ज्युनिअर कॉलेजचे प्रल्हाद लहानु खराटे यांचे ह्यदयविकाराने निधन

Next Post

आता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

Next Post
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

आता सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group