पाचोरा (अनिल येवले) – सासू- सासरे यांना स्वतःचे आई वडिलांप्रमाणे सांभाळ्यास सर्वच अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही असे मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिलाआघाडीचे सुनिता किशोर पाटील यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्थळी व्यक्त केले.
शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे शुक्रवारी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्तीथी होती. महिलांना सुनीता पाटील यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले तसेच घरातील महिला हे कुटूंबातील महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांनी प्रत्येक जबाबदारीचे भान जोपासायला व्हवे असे सांगितले.
तसेच कुटूंबातील सासू-सासरे यांचा सांभाळ स्वतःची आई वडिलांप्रमाणे करायला पाहिजे जेणेकरून सर्व अनाथाश्रम रिकामी होतील. घरातील मुलांमध्ये ही तसे संस्कार द्यायला पाहिजे.
या जगात ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, भविष्यात आपल्यावर ही अनाथाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले. पाचोरा शहर महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांना साडीचोळी सप्रेम भेट देण्यात आली. महिलांनी त्यांचे केलेले मार्गदर्शनांवर सहमती दर्शवली.