Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजित पवार राज्याचे कधीही मूख्यमंत्री होणार नाहीत

माजी खासदार निलेश राणे यांचा टोला

by Divya Jalgaon Team
February 4, 2021
in राजकीय, राज्य
0
आजित पवार राज्याचे कधीही मूख्यमंत्री होणार नाहीत

कोल्हापूर, आनिल पाटील – भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत ट्विटवरुन दिलेत.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.

अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.

मागील सव्वा वर्षाहून अधिक काळापासून राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असून उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. निलेश राणे यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चेच्या आधारे केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी साधला होता निशाणा

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. यावर अजित पवारांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला होता.

Share post
Tags: #Kolhapur#Nilesh RaneAjit PawarMarathi NewsPoliticalआजित पवार राज्याचे कधीही मूख्यमंत्री होणार नाहीत
Previous Post

३५ वर्षीय विधवा भावजयीवर दिराने केला बाथरुमध्ये बलात्कार

Next Post

अमली पदार्थाना दूर ठेवून ‘कॅन्सर’ ला करा ‘कॅन्सल’ – अधिष्ठाता डॉ. रामानंद

Next Post
अमली पदार्थाना दूर ठेवून 'कॅन्सर' ला करा 'कॅन्सल' - अधिष्ठाता डॉ. रामानंद

अमली पदार्थाना दूर ठेवून 'कॅन्सर' ला करा 'कॅन्सल' - अधिष्ठाता डॉ. रामानंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group