जम्मू: राजौरीत नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत होता. या गोळीबाराला भारताने रविवारी १० जानेवारी रोजी चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या अनेक चौकी-पहाऱ्यांचे नुकसान झाले. पाकिस्तानचे तीन जवान ठार झाले आणि किमान सहा जवान जखमी झाले. मोठे नुकसान झाल्याचे बघून पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार थांबवला.
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या भारताच्या चौकी-पहाऱ्यांना लक्ष्य करुन पाकिस्तान वारंवार गोळीबार करत होता. मागील काही दिवसांत गोळीबाराचे प्रमाण वाढले होते. पाकिस्तानने रविवारीही जोरदार गोळीबार केला. अखेर भारताने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. ज्या-ज्या भागांतून पाकिस्तान गोळीबार करत होता त्या सर्व भागांना लक्ष्य करुन नष्ट करण्याच्या उद्देशानेच जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पाकिस्तानच्या अनेक चौकी-पहाऱ्यांचे नुकसान झाले. तसेच पाकिस्तानचे तीन जवान ठार ठार झाले आणि किमान सहा जवान जखमी झाले. स्वतःचे मोठे नुकसान झाल्याचे बघून पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार थांबवला.
पाकिस्तानचा प्रयत्न गोळीबार सुरू ठेवून घनदाट जंगलातून दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्यासाठी मदत करणे हाच होता. पण भारताच्या सतर्क जवानांमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करणे शक्य झाले नाही. नौशेरातील कलसिंग भागातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. भारताने चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे नुकसान झाले.
पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या चार चौक्या पुरत्या नष्ट झाल्या. तसेच पाकिस्तानचे तीन जवान ठार ठार झाले आणि किमान सहा जवान जखमी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय जवानांचे एक पथक निवडक भागांमध्ये शोध मोहीम राबबवत आहे. धुमश्चक्री सुरू असताना एखादा दहशतवादी भारताच्या हद्दीत आला आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी दिसल्यास त्याला ठार मारण्याच्या तयारीने जवान सतर्क राहून शोध मोहीम राबवत आहेत.
याआधी पाकिस्तानने पुँछ जिल्ह्यातील बालाकोटमध्ये भारताच्या चौकी-पहाऱ्यांना लक्ष्य करुन आणि कथुआमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या हिरानगर चौकीला लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताच्या जवानांनी दोन्ही ठिकाणी लगेच कारवाई केली. भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानने गोळीबार थांबवला. पाकिस्तानच्या ताज्या कृत्यांची दखल घेऊन नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा येथे जवान खबरदारी घेत आहेत.
भारताचा सीमावर्ती भागात कडक पहारा
गोळीबार करुन भारतात दहशतवाद्यांना पाठवण्याचा प्रयत्न पाकिस्तान वारंवार करत आहे. भारत पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी करणे शक्य झाले तरी भारताने पुरेशी खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा येथे जवानांना दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. सीमावर्ती भागात कडक पहारा ठेवून भारतीय जवान पाकिस्तानचे भारतात अशांतता माजवण्याचे प्रयत्न हाणून पाडत आहेत.