जळगाव – अभासाप स्थापना दिवस आणि महर्षी वाल्मिकीं जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. या कार्यक्रमाची सुरुवात शहर अध्यक्ष सुधीर ओखदे, उपाध्यक्ष प्रा.भालचंद्र देशमुख, प्राचार्य सुभाष महाले, देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील, देवगिरी प्रांत मंत्री प्रा. विजय लोहार, अनिल राव अभ्यंकर आदी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमा पूजनाने झाली.
दरम्यान महर्षी वाल्मिकी आणि त्यांच्या लेखनाच्या विविध पैलूंवर सखोल अशी चर्चा केली महर्षी वाल्मिकींचं साहित्यातील योगदान आणि समाजातील योगदान या चर्चेचा मुख्य गाभा होता. महर्षी वाल्मिकींनी रामायणा सारखा महान ग्रंथ लिहून समाजाला एक अप्रतिम अशी सामाजिक ,साहित्यिक आणि सांस्कृतिक देणगी दिलेली आहे हा सूर मुख्यत्वाने या चर्चेतून उमटला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होते. शहर सचिव सौ विशाखा देशमुख,सह सचिव वैशाली पाटील, वैदेही नाखरे,प्रा. मुक्ती जैन, प्रा. शामकांत बाविस्कर , श्री विलास देशमुख प्रा.संदीप शिंदे, प्रा.प्रकाश महाजन व इतर साहित्य रसिकांची कार्यक्रमात लक्षणीय उपस्थिती होती


