पाचोरा प्रतिनिधी – पती अन् पत्नीच्या वादातून बोरखेडा (ता.चाळीसगाव) येथील एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या ६ वर्षाचा मुलगा चिराग अन् ४ वर्षाच्या खुशी नावाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे स्टेशनवर धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली. पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती तर पती दोन्ही मुलांसह आपल्या मूळ गावी आला होता. तसेच पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांतही कालच तक्रार केली होती. या वादातून अखेर तरुणाने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत रविवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता जीवनयात्रा संपवली. जितेंद्र दिलीप जाधव, चिराग जाधव व खुशी जाधव ही मृत झालेल्यांची नावे आहेत.


