Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – राज्य शिक्षण मंडळ

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – राज्य शिक्षण मंडळ

मुंबई, वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

“या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

4 ते 30 मार्च लेखी परीक्षा होणार असून 14 फेबु्रवारी ते 4 मार्च तोंडी परीक्षा होतील अशी माहिती देण्यात आली आहे. 70 ते 80 गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून 40 ते 60 गुणांच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र असणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती.

मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते. या ‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी आंदोलने केली होती. यामध्ये काही ठिकाणी हिंसाचारही झाला. या प्रकरणात हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली असून त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Share post
Previous Post

काशिनाथ पलोड विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त क्रांतिकारकांना श्रद्धांजली

Next Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागुन ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post
धावत्या रेल्वेचा धक्का लागुन ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

धावत्या रेल्वेचा धक्का लागुन ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group