जळगाव – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा गेल्या दोन दिवसांमधील ढग फुटी पावसामुळे नुकसान झालेल्या जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आज आयोजित होता. पूरग्रस्त भागाचा दौरा म्हणजेच त्या भागातील जनतेला एक आधार देण्याची वेळ असते. त्याच पद्धतीने नुकसानग्रस्त शेतकरी त्याच पद्धतीने तेथील जनता यांना अन्नधान्य व त्यांच्या जेवणाची सोय करणं हे पालक मंत्र्याचं प्रथम कर्तव्य असतं. परंतु या दौऱ्यामध्ये त्या पद्धतीचे चित्र दिसलं नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी त्रीव शब्दात निषेध व्यक्त केला.
आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जरी महाराष्ट्र सरकार मध्ये असलो व सदरचे मंत्री हे काँग्रेस पक्षाच्या सहकारी पक्षातील जरी असले तरी त्यांनी मात्र आज पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले असता, त्यांनी आद्यकर्तव्य म्हणजेच पूरग्रस्त भागाचा दौरा व तेथील जनतेला हवी ती मदत करायला पाहिजे होती.
परंतु पालकमंत्री मात्र पूरग्रस्त दौऱ्यावर तीच भाजप पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन निवांतपणे महाजन यांचा पाहुणचार घेत बसले व त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होत आहेत.
पालकमंत्र्यांचे या पद्धतीचे वागणे अत्यंत निंदनीय आहे व निषेधार्थ आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हा एन एस यु आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी त्रीव शब्दात निषेध व्यक्त केला.
तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचुन करमेना..!
खाजगीमध्ये आपण आपले हितसंबंध जोपासले पाहिजे, परंतु पूरग्रस्तांच्या दौऱ्यावरती आले असता, त्यावेळेस आपण आपले खाजगी हितसंबंध हे बाजूला ठेवून प्रथम कर्तव्य म्हणून पूरग्रस्तांची बाजू ऐकून घेणे व त्यांना हवी ती मदत करणे हेच पाहिजे. परंतु पालक मंत्री महाजनांच्या पाहुणचारामुळे पूरग्रस्तांनाच विसरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही..


