जळगाव, प्रतिनिधी । महामार्गावर रोज होणाऱ्या अपघातांची मालिका लक्षात घेता आज जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
आज जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले औरंगाबाद महामार्गावर रोज होणाऱ्या अपघातांची मालीका लक्षात घेता रोडवर गतीरोधक व रात्री चे अपघात टाळण्यासाठी दुतर्फा हायमस्ट L.E.D.लाईट बसविण्यात यावे यासाठी निवेदन व जनतेच्या व्यथा मांडण्यात आल्या यावेळी तालुका अध्यक्ष – मनोज डिंगबर चौधरी , प्रमोदभाऊ घुगे ,उप अध्यक्ष – समाधान पाटील, सचिन माळी , रविंद्र सोनवणे , संजय पाटील , सागर कुंटुंबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते