Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे; आ.चौधरी

दोन कृषिपंपांच्या 95 हजारांच्या वीजबिलांचा भर

by Divya Jalgaon Team
April 8, 2021
in जळगाव, प्रशासन
0
महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे; आ.चौधरी

जळगाव – महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे 95 हजार रुपयांचे वीजबिल गुरुवारी (8 एप्रिल) भरले. कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आ. शिरीष चौधरी यांनी केले आहे.

या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारित थकबाकीपैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी 33 टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आ.शिरीष चौधरी यांनी ही या अभियानात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या खिरोदा व कुंभारखेडा येथील दोन कृषिपंपांचे एक लाख 56 हजार 480 रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ 95 हजार रुपये भरावे लागले आहेत. या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. केवळ बिलात सवलतच नव्हे तर कृषिपंपांना लागणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधा विकसित करणारे हे अभियान आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आ. चौधरी यांनी केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon newsMarathi Newsआ.शिरीष चौधरीमहा कृषी ऊर्जा अभियान
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 7 लाखापेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी

Next Post

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे!

Next Post
दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे!

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group