Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : क्वारंटाईन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात एकच खळबळ

by Divya Jalgaon Team
March 16, 2021
in आरोग्य, गुन्हे वार्ता, जळगाव, प्रशासन
0
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव, प्रतिनिधी : राज्यात कोरोनाचा कहर असताना नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. असाच एक प्रकार जळगावातील जामनेर येथून समोर आला आहे. जामनेर येथील एका क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती कळताच क्वारंटाइन सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला.

यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनावणे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांची धावाधाव सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असूनदेखील जामनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मात्र कोविड सेंटरकडे दुर्लक्ष होत आहे. जामनेर पळासखेडा येथील कोविड सेंटरमधील दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत असून तीन दिवसापूर्वी कोविड सेंटरमध्ये दाखल अपंग रुग्णांची देखील प्रकृती खालावली आहे. या तीन दिवसात त्यांची साधी विचारपूसही कोणत्याच डॉक्टरांनी केली नसल्याचे या रुग्णाने सांगितले. या कोविड सेंटरमध्ये सकाळ-संध्याकाळ डॉक्टर नर्स व्हिजिटला येतात, परंतु फक्त रुग्णांची हजेरी घेण्यासाठी.. रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे बंद स्थितीत असतानासुद्धा रुग्णांचे दैनंदिन अहवाल कागदोपत्री पूर्ण असल्याचे येथील रुग्णांच्या तोंडून समजत आहे.

त्याच बरोबर रुग्णांच्या आहाराबाबत म्हणा किंवा सेंटरमधील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. त्यामुळे रूग्णांच्या गैरसोयींमुळे आणि वारंवार तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या संतप्त रुग्णांनी अखेर सेंटर मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खुलेआम फिरणार का आणि फिरणार तर यामुळे जर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Share post
Tags: Covid CentreJalgaonjammerधक्कादायक : क्वारंटाईन सेंटरमधून 15 रुग्ण फरार; जिल्ह्यात एकच खळबळ
Previous Post

युजीसीचा मोठा निर्णय, सीएच्या डिग्रीला आता पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता

Next Post

जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने वसीम रिजवी विरोधात तक्रार

Next Post
जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने वसीम रिजवी विरोधात तक्रार

जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने वसीम रिजवी विरोधात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group