जळगाव – जळगाव जिल्ह्यात तीन दिवसाचा जनता कर्फ्यूत घोषित करण्यात आल्याने आपले कर्तव्य बाजवणारे पोलीस कर्मचारी व महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपतर्फे चहा नाश्ता देण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केल्याने रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडणारे पोलीस कर्मचाऱ्यांचा तसेच महानगर पालिका कर्मचारी यांना सर्वच दुकाने बंद असल्याने हे कर्मचाऱ्यांचे उन्हात गैरसोय न होण्यासाठी टायगर ग्रुप जळगाव शहरातर्फे चहा नाश्ता, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी गौरव उमप ,मनोज बाविस्कर, सोपान मानकर, ग्रामपंचायतचे सदस्य आनंद घुगे ,जितू निंबाळकर ,जयेश साळवे, दिपक गायकवाड ,विवेक नेतले ,प्रवीण निंबाळकर ,प्रणव शर्मा ,कुणाल बारी, मनोज पाटील ,निलेश पाटील आदींच्या यात सहभाग होता.