नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी ओडिशातील कोरापूट जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली होती. मुर्ताहांडीजवळ पिकअप वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले होते.या पिकअप वाहनातून प्रवासी ओडिशातील सिंधीगुडा गावातून छत्तीसगडच्या कुलता या गावी निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ही भीषण दुर्घटना घडली होती.
Andhra Pradesh: 13 people killed, 4 injured in a collision between a bus and a truck near Madarpur village in Veldurti Mandal, Kurnool district in the early morning hours; injured admitted to Government General Hospital pic.twitter.com/Ve1hHqTBkZ
— ANI (@ANI) February 14, 2021