Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

by Divya Jalgaon Team
January 16, 2021
in राष्ट्रीय
0
आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : भारतात आज 16 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान (Coronavirus Vaccination) सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण अभियानाची (vaccination Programme) सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी देशातील वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं असून जगातील सर्वात मोठा कोरोना वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू होत असल्याचं सांगितलं.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

– आज वॅक्सिस रिसर्चशी जोडलेले अनेक लोक, वैज्ञानिकांचं विशेष कौतुक जे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाविरोधात लस बनवण्यासाठी जुडले आहेत. साधारणपणे, एक वॅक्सिन बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जातो, मात्र आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी एक नाही, तर दोन मेड इन इंडिया वॅक्सिन तयार झाल्या आहेत.

– संपूर्ण देश आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता. कित्येक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरात लहान मुलं, वृद्ध, तरुण सर्वच जण कोरोना वॅक्सिन कधी येणार हाच प्रश्न विचारत आहेत. आता अतिशय कमी वेळात, लस आली आहे.

– आता काही वेळातच भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरू होत आहे. याबाबत मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

– कोरोना वॅक्सिनचे 2 डोस घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोनाविरोधात आवश्यक शक्ती विकसित होईल.

– इतिहासात, अशाप्रकारे आणि इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान यापूर्वी कधीही झालं नसल्याचं मोदींनी म्हटलंय. जगात 100 हून अधिक असे देश आहेत, ज्यांची लोकसंख्या 3 कोटींहून कमी आहे आणि भारत लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात 3 कोटी लोकांचं लसीकरण करत आहे.

– दुसऱ्या टप्प्यात आपल्याला हे 30 कोटी संख्येपर्यंत पोहचवायचं आहे. वृद्ध, गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना या टप्प्यात लस दिली जाईल. भारत,चीन आणि अमेरिका हे 30 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेले केवळ तीन देश आहेत.

– तसंच, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. सोशल डिस्टंन्सिंग पाळ्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचं मोदींनी सांगितलं.

Share post
Tags: Marathi NewsNew DelhiPM Narendra Modiआजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
Previous Post

आजचे पेट्रोल-डिझेलचे किंमती स्थिर, जाणून घ्या दर

Next Post

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

Next Post
कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group