यावल (रविंद्र आढाळे) – येथील तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आज ७ वाजेपासुन सुरूवात झाली असुन आतापर्यंत ४६ ग्रामपंचायतीवर टक्के मतदारांनी आपल्या मतदाना हक्क बजावला असुन शेवटच्या टप्यात मतदानाची टक्केवारीही वाढणार असल्याचे बोलले जात आहे . दरम्यान यावल तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नावरे ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकी करिता महीलांनाच या ठीकाणी मतदान करण्यात येईल.
यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने सखी महीला१ / १मध्ये जिल्हा परिषद शाळेत मतदान केन्द्राची उभारणी करण्यात आली असुन या केन्द्रावर मतदान केन्द्रा अध्यक्ष म्हणुन पुष्पा विजय आहिराव, केन्द्र अधिकारी कल्पना देविदास माळी व हसीना गंभीर तडवी तर मतदान केन्द्र शिपाई फातेमा चंद्रशेखर तडवी , पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी राजश्री चंपालाल मोर्य यांची नेमणुक करण्यात आली असुन, या केन्द्रास शिरपुर विभागाचे प्रांत अधिकारी व निवडणुक निरिक्षक व्ही व्ही बादल यांच्यासह यावल तालुका निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार ,पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमुळे यांच्यासह आदी प्रशासकीय पातळीवरील अधिकारी यांनी या सखी महीला मतदान केन्द्राची पाहणी करून या आगळ्यावेगळ्या प्रयोगा बद्दल माजी सरपंच समाधान पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले, या महीला मतदान केन्द्रावर २ .३ ० वाजेपर्यंत ९० टक्के मतदान पार पडले असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे .