मुंबई | राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं चित्र दिसतंय. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.मोठा निर्णय : आता फेरीवाले व दुकानदारांची होणार कोरोना चाचणी.
सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेता फेरीवाले, दुकानदार तसंच गाळेधारकांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.
या अंतर्गत महापालिकेकडून दादर, जोगेश्वरी तसंच बोरिवली या भागांमधील फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आलीये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान यासाठी महापालिकेने 244 ठिकाणी मोफत करोना चाचणी केंद्रे सुरू केलीयेत. शिवाय दिवाळीनंतर कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून 15 ते 17 हजार चाचण्या दर दिवसाला केल्या जातायत.