Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राजकारणाला बळी न पड़ता जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट शाळा बनवणार – पुरुजीत चौधरी

by Divya Jalgaon Team
March 21, 2022
in जळगाव, राजकीय
0
राजकारणाला बळी न पड़ता जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट शाळा बनवणार – पुरुजीत चौधरी

यावल प्रतिनिधी – यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत  कोणत्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता आणि  ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या कृत्याला बळी न पडता जिल्हा परिषद शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्या साठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात डांभुर्णी ग्रामपंचायत उपसरपंच तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी म्हटले आहे.

 दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुरूजीत चौधरी यांनी म्हटले आहे की, डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आले होते त्यावेळेस शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांसह इतर उपस्थित शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच पुरुजित चौधरी यांनी ग्रामपंचायत मार्फत आणि त्यांच्या पत्नी तथा यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत तसेच जिल्हा परिषद सदस्य आर. जी.नाना यांनी जिल्हा परिषद मार्फत आमच्या शाळेसाठी भरीव मदत केली असल्याचे सांगून तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रेमापोटी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आर्थिक देणग्या दिल्या त्याबद्दल कौतुक केले होते आणि आहे, तसेच त्यांनी साहेबांना सांगितले की,पुरूजीत चौधरी हे गेल्या तीन वर्षापासून शाळेत सतत रोज किंवा एक दिवसाआड संपर्कात असतात.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या इच्छेनुसार कुवतीनुसार,परिस्थितीनुसार जिल्हा परिषद शाळेला देणगी दिली परंतु सर्वांची नावे आली पाहिजे म्हणून आणि कोणावरही अन्याय होणार नाही म्हणून आपण सर्वांना घेऊन त्यांचा सत्कार करणार होतो,यात कोणताही राजकीय हेतू नव्हता परंतु गावातील एकाने फक्त राजकारण म्हणून याला वेगळे स्वरूप आणले यात पक्षपातीपणा आणि भेदभावाचे राजकारण सुरू केल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणि देणगी देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 परंतु त्यानंतर जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास होत असल्याने याचे वर्चस्व काहींना सहन न झाल्याने त्यांनी कुटील षडयंत्र रचून जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्यां विरुद्ध काही जणांना आणि काही ठराविक ब्लॅकमेलर यांच्या मार्फत वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी राजकीय सामाजिक आणि ग्रामस्थांची दिशाभूल करून शाळेची आणि चांगले काम करणाऱ्यांची बदनामी करून  राजकीय,सामाजिक,राजकारण सुरू केले आहे.

येत्या दि. 23 मार्च रोजी या काही राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेत देणगीदार यांचा सत्कार आयोजित केला आहे,देणगीदारांचा सत्कार आवश्यक आहे परंतु ज्या पद्धतीने राजकीय षड्यंत्र व तसेच गटातटाचे राजकारण करून हा कार्यक्रम राबविला जातोय तो शाळेसाठी व गावासाठी घातक ठरणार आहे. निव्वळ स्वतः न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी शाळेचे व तसेच गावाचे वातावरण गढूळ करून ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहेत.

Share post
Tags: #ग्रामपंचायत उपसरपंच#डांभुर्णीYawal Newsजिल्हा परिषद
Previous Post

खान्देशात ‍वीजबिल भरण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कायम

Next Post

जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा

Next Post
जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा

जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group