Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना दिलासा ! 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

by Divya Jalgaon Team
April 3, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
शिक्षण खात्यातील भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील मुलांना एक दिलासा मिळाला आहे. हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांशी संवाद साधला. तेव्हा बोलताना गायकवाड म्हणाल्या, करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षण विभागाने मधल्या काळात ऑनलाइन, ऑफलाइन, यूट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले.

कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल. pic.twitter.com/HDVdrPdxyu

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 3, 2021

/p>

१ ली ते ४ थीच्या शाळा आपण संपूर्ण वर्षभर सुरु करू शकलो नाही. ५ वी ते ८ वीच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या, तर काही ठिकाणी नाही. जेथे शाळा सुरू झाल्या तेथेही अभ्यासक्रम पूर्ण करता आले नाही. असे त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी म्हटले, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खरे पाहता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र यंदाच्या वर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.’ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Share post
Tags: #Varsha GaikwadEducationMumbaiविद्यार्थ्यांना दिलासा ! 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश
Previous Post

कोरोनाच्या सावटामध्ये गेल्या वर्षभरात महावितरणकडून 8 लाखांवर वीजजोडण्या

Next Post

डी-मार्टचे मालक दमानी यांनी मुंबईत घेतलं तब्बल 1 हजार कोटींचं अलिशान घर

Next Post
डी-मार्टचे मालक दमानी यांनी मुंबईत घेतलं तब्बल 1 हजार कोटींचं अलिशान घर

डी-मार्टचे मालक दमानी यांनी मुंबईत घेतलं तब्बल 1 हजार कोटींचं अलिशान घर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group