जळगाव – आज जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कुंसुंबा येथील भारनियमन बंद करा व स्थानिक नागरिकांना तसेच छोट्या दुकानदारांना भर उन्हाळ्यात दिलासा द्या यासाठी आज काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महावितरणचे अभियंता चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनोज डिंगबर चौधरी, प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, भिकन सोनवणे, धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे, सचिन माळी, रविंद्र कोळी, महेश महाजन, गजु परदेशी आदी उपस्थित होते. लवकरात लवकर भारनियम कमी करु व कुसुंबे करांना या कोरोना व उन्हाळा काळात दिलासा देवू हा शब्द अभियंता चौधरी यांनी दिला.