चोपडा – चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पपई लावली होती. मात्र बाजारभाव पडल्याने शेतात लावलेला खर्च ही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने हताशपणे यावल रस्त्यावरील शेतात गुरांना पपई टाकली.
इंधन दरासह सर्वत्र महागाई वाढत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती कसण्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीचेही दर वाढले आहे. शेत मालाला हमी भाव तर मिळत नसल्याने लावलेला खर्च ही निघत नाही. त्यामुळे सर्वत्र शेतकरी वर्ग हवाल दिल झाला आहे.
असाच एक प्रकार यावल रस्त्यावर पहावयास मिळाला आज चक्क शेकडो गाई पपई खात होत्या,आमचे दिव्य जळगाव चे प्रतिनिधि मिलिंद सोनवणे ह्यांनी ठिकाणी जावून सविस्तर माहिती घेतली तेव्हा कळले की खुद्द शेतकऱ्यानींच आपल्या शेतातील पपईला भाव नसल्याने आणि लावलेला खर्च ही निघत नसल्याने पपई यावल रस्त्यालगतच्या शेतातील गायींसमोर फेकून दिल्यात.